![]() |
भारत जोडो यात्रेच्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर 'भारत न्याय यात्रा' |
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वर्षभरापूर्वी काढण्यात आलेल्या भारत जोडो यात्रेला भरघोस प्रतिसाद मिळाला.या यात्रेच्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी येत्या १४ जानेवारीपासून पूर्व-पश्चिम अशी भारत न्याय यात्रा काढणार आहे.
जनतेच्या आर्थिक, सामाजिक व राजकीय न्यायासाठी ही यात्रा काढली जाणार असून, या यात्रेला हिरवा झेंडा पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे दाखविणार आहेत.२१ डिसेंबरला झालेल्या काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरू करण्याचा प्रस्ताव सर्व सदस्यांनी दिला होता.
मणिपूर येथून भारत न्याय यात्रेला सुरूवात होणार असून आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात व महाराष्ट्र या राज्यामधून ही यात्रा जाणार आहे.