 |
अपूर्ण महामार्गाच्या कमाविरोधात राष्ट्रवादीचा मोर्चा |
सांगलीमधील कडेगांव येथे महामार्गाच्या अपूर्ण कामाविरोधात राष्ट्रवादीचा मोर्चा काढण्यात आला,ह्या मोर्चा चा उद्देश असा की गुहागर ते विजापूर हे राष्ट्रीय महामार्गातील काम ही अर्धी रखडली गेलेली दिसून येते, तसेच येवलेवाडीतील टोलनाका सुरू करू नये अशी ही मागणी करण्यात आलेली आहे,तसेच रखडलेली काम पूर्ण ह्या मागणीसाठी पाणी संघर्ष समिती व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला.तसेच कऱ्हाड ते अमारापुर पर्यंत असलेले जास्त उंचीचे गतिरोधक काढावेत आणि कमी उंचीचे गतिरोधक बसवावेत ह्या सर्व मागण्यांसाठी आज कडेगाव बस्थानक चौकात राष्ट्रवादी काँग्रेस व कडेगांव पाणी संघर्ष समिती यांच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.यावेळी बोलताना कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग व उपविभागाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक निहाल कळेकर ह्यांनी सांगितले गेले कीयापूर्वी काढलेले असून उर्वरित ३५० ते ४०० पांढरे गतिरोधक १५ जानेवारीपर्यंत काढले जातील. तसेच महामार्गाची जी काही कामे अपूर्ण आहेत किंवा ज्या काही सुधारणा करावयाच्या आहेत त्या तात्काळ पूर्ण केल्या जातील.सुर्ली घाटात महामार्ग चारपदरी करावा, महामार्गाच्या दुतर्फा तोडलेली झाडे नियमानुसार पुन्हा लावावीत, कडेगाव शहरातील अपूर्ण नाल्यांची कामे पूर्ण करावीत, येवलेवाडी येथील टोल नाका सुरू करू नये. मार्गाची अपूर्ण कामे पूर्ण करावयाच्या आहेत त्या तत्काळ पूर्ण केल्या जातील.
यावेळी जयदीप यादव, जगदीश महाडिक, सोमनाथ पवार, बजरंग आडसुळ, नामदेव रास्कर, विशाल जाधव, किरण कुराडे, अभिमन्यू वरुडे, दीपक न्यायनीत, सुरेश शिंगते, आप्पा यादव, आसिफ इनामदार, शहीद पटेल, मोहंमद पटेल, महामार्ग अभियंता गणेश कापरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.