व्यावसायिकांना नवी संधी

0


व्यावसायिकांना नवी संधी

केंद्र सरकारच्या वतीने पारंगत  जपणारी तसेच पारंपरिक कौशल्य असलेल्या करागिरकरिता एक नवी संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सांगलीमध्ये सुरू करण्यात आली आहे.ह्या योजनेचा लाभ व्यावसायिक तीन लाखापर्यंत कर्ज मिळवू शकतो,या योजनेसाठी सरपंचासह कारागिरांना ही पोर्टलवर नोंदणी करणे गरजेचे आहे. पूर्ण जिल्ह्यामधे ६७१ सरपंचाची नोंदणी पूर्ण झाली आहे,तसेच आता कारागिरांची ह्या योजनेअंतर्गत १८ प्रकारच्या कारागिरांना कौशल्य प्रशिक्षणासह नोंदणी करून कर्ज सुविधेचा लाभ दिला जाणार आहे. ह्या योजनेमध्ये सुतार, कुंभार, अशा १८ पारंपरिक उद्योग कारागिरांना प्रशिक्षण दिले जाणार आहे,ह्याबाबत आवश्यक असणारी कागदपत्रे ही कोणती असावी ह्याची यादी ही नमूद करण्यात आली आहे आधारकार्ड, पॅनकार्ड, जातीचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, रेशनकार्ड, बँकेचं पासबुक आणि मोबाईल क्रमांक आवश्यक आहे.येथे दहा हजार कारागिरांची नोंदणी करण्यात आली,जिल्ह्यातील दहाही तालुक्यातील सरपंचाची नोंदणी करण्यात आली आहे. सरपंचांग आता कारागिरांच्या नोंदणीवर भर दिला जात आहे.तसेच दहाही तालुक्यातील ६७१ ग्रामपंचायतमधून ९२७ कारागिरांची पोर्टलवर नोंदणी झाली आहे. जास्तीत जास्त कारागिरांनी नोंदणी करण्याचे आवाहन केले जात आहे.


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top