अंगणवाड्यांच्या चाव्या ताब्यात घेण्याचे आदेश

0

 

अंगणवाड्यांच्या चाव्या ताब्यात घेण्याचे आदेश 

डिसेंबर महिन्यापासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस संपावर असल्यामुळे सांगली जिल्ह्यातील २ हजार ७८२ अंगणवाड्या ह्या बंद झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांच्या चाव्या ताब्यात घेण्याची सूचना एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल यांनी जिल्हा प्रशासनाला दिली आहे. सांगली जिल्ह्यात २ हजार ७८२ अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यामध्ये सुमारे ६२ हजार बालके शिकण्यासाठी येतात. त्यांचे आरोग्य व्यवस्थित आणि चांगले राहण्यासाठी अंगणवाडी आणि मदतनीस यांच्या मदतीने त्या बालकांना दररोज पोषण आहार दिला जातो. या पोषण आहारामध्ये साखर, गहू, खिचडी आणि मूगडाळ अशा विविध पदार्थांचा समावेश आहे. तसेच काही बालकांना आहार घरपोचही दिला जातो.

मात्र डिसेंबर महिन्यांपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील २ हजार ६४७ सेविका आणि तसेच मदतनीस असे एकूण सुमारे ४ हजार ८९८ कर्मचारी संपावर गेले आहेत. याचा परिणाम अंगणवाड्या महिनाभर बंद आहेत. त्यामुळे अंगणवाडीतील ६२ हजार बालकांच्या पोषण आहारावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.तसेच गर्भवती मातांना जो आहार दिला जातो त्यावर देखील परिणाम झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने लाभार्थी आहारापासून वंचित राहू नये, यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणुन अंगणवाडयाच्या चाव्या घेण्याच्या अग्रवाल यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

अंगणवाडी ही शासनाची मालमत्ता आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतीच्या सहाकार्याने अंगणवाडी सेविकांकडून पंचनामा करून तातडीने किल्ल्या ताब्यात घ्याव्यात. तसेच नागरी भागात बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी स्वयंसेवक, स्थानिक नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांच्या समक्ष पंचनामे करावेत. आणि चावी देण्यास टाळाटाळ केल्यास कायदेशीर कारवाई करावी, अशा सूचना अग्रवाल यांनी दिल्या आहेत.



Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top