सांगलीतील द्राक्षबागांवर काळ्या ठिपक्यांचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

0


 सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील पाच हजार एकर क्षेत्रात द्राक्षबागा आहेत. या बागांमध्ये गेल्या काही दिवसांत काळे आणि तपकिरी रंगाचे ठिपके दिसून येत आहेत. या ठिपक्यांमुळे द्राक्ष घड कुजून जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

या ठिपक्यांचा प्रादुर्भाव बुरशी आणि जिवाणूमुळे होत असल्याचे द्राक्ष संशोधन केंद्रातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या रोगामुळे द्राक्ष मण्यांच्या टोकावर आणि मण्यांवर काळे आणि तपकिरी लहान, गोलाकार ठिपके दिसून येतात. तसेच, द्राक्ष मणी कुजतात आणि कोरडे होतात.

या रोगामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मिरज, तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी जवळपास २५० कोटी रुपयांचे द्राक्ष काढून बागेच्या बाहेर फेकले आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.या रोगापासून द्राक्षबागांचे संरक्षण करण्यासाठी द्राक्ष संशोधन केंद्राने काही उपाययोजना सुचवल्या आहेत. त्यानुसार,जास्त खराब झालेले घड काढून टाकावेत.उर्वरित घडातील खराब मणी काढून टाकावेत.काढलेले घड आणि मणी बागेच्या बाहेर पुरून टाकावेत.बागेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी करण्यासाठी बागेत खेळती हवा ठेवावी.ज्या बागा अजूनही निरोगी आहेत, अशा बागांमध्ये रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ट्रायकोडर्मा, ऑपिलोमायसिस या जैविक बुरशीनाशकांची फवारणी करावी.

शासनाने या शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी द्राक्षबागायतदार संघाच्या संचालक रायगोंडा पाटील यांनी केली आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top