सांगलीतील कसबे डिग्रज सर्कलमध्ये दुष्काळाची टांगती तलवार

0


 सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज सर्कलमधील मौजे डिग्रज, कसबे डिग्रज, तुंग, पद्माळे, कर्नाळ या गावांमध्ये पाणी टंचाईमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या भागातील ३० ते ४० टक्के पिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर, स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने कसबे डिग्रज सर्कलमधील दुष्काळग्रस्त भागात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आमदार जयंत पाटील यांच्याकडे करण्यात आली. या मागणीचे समर्थन करण्यासाठी सर्कलमधील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

निवेदनात म्हटले आहे की, या भागात गेल्या काही वर्षांपासून पाऊसमानात घट होत आहे. तसेच, नदी-नाल्यांतील पाणीसाठा कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी मिळणे कठीण झाले आहे. यामुळे पिकांचे नुकसान होत आहे.शेतकऱ्यांच्या मागण्यांवर विचार करून, कसबे डिग्रज सर्कलमधील दुष्काळग्रस्त भागात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आमदार जयंत पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे. पाटील यांनी या मागणीचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने खालील उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाने केली आहे:कसबे डिग्रज सर्कलमधील दुष्काळग्रस्त भागात दुष्काळ जाहीर करावा.दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी.शेतऱ्यांच्या कर्ज वसुलीस स्थगिती द्यावी.शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करावे.या मागण्यांचे निराकरण झाल्यास दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top