रोहित पाटील म्हणाले, टेंभू योजनेच्या विस्तारित प्रकल्पास सुप्रमा मिळावी आणि वंचित गावांना हक्काचे पाणी मिळावे, या मागणीसाठी २ ऑक्टोबर रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमदार सुमन पाटील यांच्यासोबत शेकडो शेतकऱ्यांना घेऊन आम्ही उपोषण केले. त्यावेळी विरोधकांनी आमच्या उपोषणाची चेष्टा केली. मात्र उपोषणाच्या नसत्या इशाऱ्यानंतर वंचित गावांसाठी ८ अंतिम मंजुरी मिळाली होती.
त्यानंतर जलसंपदा तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महिन्यात टेंभूच्या विस्तारित प्रकल्पास सुप्रमा देण्याचे आश्वासन दिले होते. जर महिनाभरात सुप्रमा मिळाली नाही तर मंत्राल्यासमोर उपोषण करण्याचा इशारा त्यावेळी आम्ही दिला होता. मात्र काही तांत्रिक गोष्टी पूर्ण होण्यास विलंब लागत असल्याने जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी आमदार सुमन पाटील यांची भेट घेऊन मुदत वाढवून घेतली होती.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्यात वातावरण अस्थिर झाले होते. त्यामुळे मुंबईतील आंदोलन आम्ही थोडे दिवस स्थगित केले होते.दरम्यान, काल या योजनेच्या सुप्रमाचा शासन निर्णय अधिकृतरित्या मिळाला. आम्ही ही मान्यता मिळवण्यासाठी जे-जे प्रयत्न केले त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत.
रोहित पाटील यांनी पुढे सांगितले की, टेंभू योजनेच्या विस्तारित प्रकल्पास सुप्रमा मिळण्यासाठी आम्ही अनेक पातळीवर प्रयत्न केले.आम्ही सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले.आमदार सुमन पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सुप्रमा मिळवण्यासाठी पाठपुरावा केला.आमदार अनिल बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सुप्रमा मिळवण्यासाठी पाठपुरावा केला.आम्ही राष्ट्रवादीचे केंद्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही याबाबत चर्चा केली.या सर्व प्रयत्नांच्या परिणामस्वरुप टेंभू योजनेच्या विस्तारित प्रकल्पास सुप्रमा मिळाली आहे.
रोहित पाटील यांनी यावेळी खासदार संजय पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली. ते म्हणाले की, काहीजण आम्हीच टेंभू योजनेचे शिल्पकार असल्याचे सांगत आहेत. मात्र, या प्रकल्पास सुप्रमा मिळवण्यासाठी आम्ही केलेले प्रयत्न हेच या प्रकल्पाचे शिल्पकार आहेत.