जिल्ह्याला पावसाने झोडपले | शेवटच्या टप्प्यामधील आंबा पिकाचे होणार नुकसान

0

 


रत्नागिरी : 

मान्सूनपूर्व पावसाने मंगळवारी जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले. रत्नागिरी शहर परिसरात तर दुपारी १ वाजता पावसाने जोरदार सुरुवात केली. जिल्ह्यात सर्वत्रच हा पाऊस पडला. या पावसामुळे आंबा पिकाचे शेवटच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.

गेले ४-५ दिवस जिल्ह्यात अनेक ठिकाणी तुरळक असा पाऊस पडत होता. सोमवारी सायंकाळी चिपळूण, संगमेश्वर परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. रात्री काही भागात तुरळक पाऊस पडला, मंगळवारी दुपारी १ वाजल्यापासून रत्नागिरी शहर व परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. 

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top