लोणावळा येथे क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून स्थानिक तरुणांच्या हल्ल्यात मौजे अडूर-कोंडकारूळ (ता. गुहागर) येथील कमलेश तानाजी धोपावकर या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि गुहागर मतदारसंघाचे आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी आज मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मृतकाच्या कुटुंबाला विशेष बाब म्हणून आर्थिक सहाय्य देण्याची मागणी केली.
![]() |
आमदार भास्करराव जाधव यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र |
याशिवाय, या प्रकरणातील अद्याप फरार असलेल्या आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी आपल्या निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
या घटनेनंतर मृतकाच्या गावात आणि गुहागर तालुक्यात संतापाची लाट असून, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि कुटुंबाला न्याय मिळावा, अशी जनतेची मागणी आहे.