
कोरोना व्हायरसने (COVID-19) पुन्हा एकदा भारतात डोकं वर काढलं असून देशभरात सध्या 425 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात एकट्या 76 नवीन रुग्णांची भर पडली आहे, हे स्पष्ट करतं की राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा वाढतो आहे.
मुंबईत 27, पुण्यात 21 आणि ठाण्यात 12 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ही आकडेवारी कमी वाटू शकते, पण वाढीचा वेग आणि मागील अनुभव पाहता ही एक मोठी इशारा देणारी स्थिती आहे. मात्र महाराष्ट्र सरकार अजूनही जागं झालेलं दिसत नाही. कोणत्याही दृष्टीने ठोस उपाययोजना न करता, सरकार केवळ बैठका आणि सूचना यांच्या पातळीवरच अडकलेलं आहे.मागील लाटांमध्ये आरोग्य व्यवस्था कोलमडल्याचा अनुभव महाराष्ट्राला आहे. तरीही या वेळेस सरकारने नवे रुग्ण वाढत असतानाही हॉस्पिटल्समध्ये सुविधा वाढवणं, औषधे आणि ऑक्सिजनचा साठा ठेवणं, टेस्टिंग वाढवणं यासाठी कोणताही ठोस कृती कार्यक्रम सुरू केलेला नाही. केंद्र सरकार केरळ, दिल्लीसारख्या राज्यांमध्ये खबरदारीचे उपाय सुरू करत असतानाच, महाराष्ट्र सरकार मात्र उदासीन असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे. ही झोप आता महागात पडू शकते.राज्य सरकारने त्वरित जागं होऊन आरोग्य यंत्रणा सक्षम करणं, जनजागृती मोहीम राबवणं, आणि नागरिकांना योग्य सुविधा पुरवणं अत्यावश्यक आहे. अन्यथा कोरोनाची ही लाट पुन्हा एकदा गंभीर परिणाम घडवू शकते – आणि त्याला जबाबदार असणार महाराष्ट्र सरकारची ही अक्षम्य निष्क्रियता.