![]() |
माजी आमदार निर्मला गावित |
सत्तेच्या जोरावर विरोधी नेत्यांना आपल्याकडे वळवण्याचा डाव पुन्हा एकदा यशस्वी करत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला गावित यांना आपल्या गटात दाखल करून घेतलं. हा प्रकार नाशिक महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठा झटका मानला जात आहे.मात्र या घडामोडींमुळे एक प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय—लोकशाहीत विचारांवर चालणारी निष्ठा जिंकणार, की सत्तेच्या बळावर खरेदी होणारी निष्ठा?
निर्मला गावित या दोन वेळा आमदार राहिलेल्या, आणि माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांच्या कन्या आहेत. काँग्रेसमधून राजकीय कारकीर्द सुरू करून, 2019 मध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता. आता मात्र सत्ता, साधनसंपत्ती आणि प्रशासनाच्या दबावात त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेश सोहळ्यात एक हजार महिला आणि जिल्हा परिषद महिला कर्मचारीदेखील शिंदे गटात दाखल झाल्या. सत्तेचा प्रभाव की जनतेचा आवाज — हा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा ऐरणीवर आलाय.
एकनाथ शिंदे यांचे भाषण हमखास मिश्किल आणि टोलेबाज शैलीत होते. "दराडे आले, लक्ष्मणही आला, आता निर्मला गावित आल्या," असं म्हणत त्यांनी आपला पक्ष विस्तार उघडपणे मिरवला. मात्र, ही मिश्किली जनतेच्या भावना दुर्लक्षित करणारी आहे, असं अनेकांचं मत आहे.शिंदे गटात नेते जात असले तरी कार्यकर्त्यांची आणि सामान्य जनतेची नाळ अजूनही ठाकरे गटाशी जोडलेली आहे. कारण उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व केवळ पदासाठी नाही, तर शिवसेनेच्या मूळ विचारांशी बांधिलकी असलेलं नेतृत्व आहे. त्यांच्याकडे सत्ता नाही, पण सहानुभूती, संघर्ष आणि जनतेचा विश्वास आहे जे खरे हीरो ठरवतात.
सत्तेच्या साहाय्याने शिंदे गटाने काही नेते आपल्या बाजूला वळवले खरे, पण जनतेच्या मनात कोणाची जागा आहे, हे ठरवण्याचं काम अजून बाकी आहे.उद्धव ठाकरे यांची शिवसेना आज सत्तेविना लढत आहे, पण तिथे आहे विचार, श्रद्धा आणि त्याग.तर दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांची शिवसेना सत्तेच्या जोरावर विस्तारते आहे, पण त्या विस्ताराला किती काळ टिकवता येईल?
हे उत्तर येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये स्पष्ट होईल. पण एक गोष्ट नक्की — सत्तेचा भास क्षणभंगुर असतो, पण विचार आणि निष्ठा कालातीत असतात