मुंबई | प्रतिनिधी
राज्य शासनाने पर्यावरण रक्षण आणि शाश्वत विकासासाठी मोठा पाऊल उचलले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत यंदा राज्यात 10 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पुढील वर्षीही याच प्रमाणात झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे.‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या व्यापक मोहिमेची बैठक मंत्रालयात झाली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, “वृक्षलागवड ही एक सरकारी योजना न राहता जनआंदोलन व्हायला हवी. त्यासाठी प्रशासन, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था आणि सामान्य नागरिकांचा सक्रीय सहभाग आवश्यक आहे.”
🔹 उपक्रमाची वैशिष्ट्ये:
संपूर्ण राज्यभर वृक्षलागवडीसाठी सर्व जिल्हा प्रशासन, वन विभाग, कृषी विभाग व स्थानिक स्वराज्य संस्थांनी एकत्रित काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
🟢 आपल्या सहभागानेच होईल हरित महाराष्ट्र!
आपणही आपल्या परिसरात झाडे लावून या अभियानात सामील व्हा.
- 2025 मध्ये 10 कोटी झाडांची लागवड करण्याचे लक्ष्य
- सर्व शासकीय विभागांना मोहिमेत सक्रीय सहभागी होण्याचे निर्देश
- शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक व उद्योग समूहांचाही सहभाग
- पर्यावरण संरक्षणासोबत रोजगार निर्मितीची संधी
- राज्यातील जंगल क्षेत्रात वाढ आणि हवामान बदलाशी लढा देण्याचा प्रयत्न
संपूर्ण राज्यभर वृक्षलागवडीसाठी सर्व जिल्हा प्रशासन, वन विभाग, कृषी विभाग व स्थानिक स्वराज्य संस्थांनी एकत्रित काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
🟢 आपल्या सहभागानेच होईल हरित महाराष्ट्र!
आपणही आपल्या परिसरात झाडे लावून या अभियानात सामील व्हा.