![]() |
सांगली: बांधकाम कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा |
जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी बुधवार दि. 28 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर कामगार नेते शंकर पुजारी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.गेल्या एक वर्षापासून जिल्ह्यातील बांधकाम कामगाराचे अर्ज निकाली काढावेत, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.तरीही. कामगार मंत्र्यांच्या जिल्ह्यातच ७५ हजार अर्ज निर्णयाविना आहेत.
यावेळी सांगली शहराचे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांना निवेदन देण्यात आले.तसेच पूर्वी ही कितीतरी वेळा कामगार मंत्र्यांना भेटून याबाबत निवेदन देण्यात आले होते.पण अजूनही यावर अंमलबजावणी झाली नाही.सध्या जिल्ह्यामध्ये ४२ हजार नवीन नोंदणीसाठी केलेले अर्ज एप्रिल महिन्यापासून तपासले नाहीत.तसेच नूतनीकरणाचे १० हजार अर्ज प्रलंबित आहेत. परिणामी ५२ हजार कामगारांना मंडळाकडून लाभ मिळू शकत नाही.
राज्यातील प्रमुख कामगार संघटनांच्या बरोबर सचिवांनी अर्ज निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते पण अजूनही त्याची पूर्तता झाली नाही.जर कामागारांचे प्रश्न निकाली नाही काढले तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ८ जानेवारी २०२४ पासून कामगार बेमुदत उपोषण सुरु करू असा इशारा बांधकाम कामगारांनी दिला.
यावेळी सांगली शहराचे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांना निवेदन देण्यात आले.तसेच पूर्वी ही कितीतरी वेळा कामगार मंत्र्यांना भेटून याबाबत निवेदन देण्यात आले होते.पण अजूनही यावर अंमलबजावणी झाली नाही.सध्या जिल्ह्यामध्ये ४२ हजार नवीन नोंदणीसाठी केलेले अर्ज एप्रिल महिन्यापासून तपासले नाहीत.तसेच नूतनीकरणाचे १० हजार अर्ज प्रलंबित आहेत. परिणामी ५२ हजार कामगारांना मंडळाकडून लाभ मिळू शकत नाही.
राज्यातील प्रमुख कामगार संघटनांच्या बरोबर सचिवांनी अर्ज निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते पण अजूनही त्याची पूर्तता झाली नाही.जर कामागारांचे प्रश्न निकाली नाही काढले तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ८ जानेवारी २०२४ पासून कामगार बेमुदत उपोषण सुरु करू असा इशारा बांधकाम कामगारांनी दिला.