 |
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तारा भावाळकर |
सांगली भागातील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तारा भावाळकर यांना महाराष्ट्र फाउंडेशन चा जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. सांगलीला हा प्रथमच मिळाला आणि सर्वात महत्त्वाचं समाजामध्ये मध्ये आदर्श ठरत याच उत्तम उदाहरण कौतुक करुशी वाटते.तसेच, ग्रामीण भागातील साक्षी कोळसे ह्या शिवाजी विद्यापिठात प्रथम आल्या. अत्यंत गुणवत्तेला प्रोत्साहन देणारी,वाणिज्य विषयात प्रथम येत त्यांनी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील पारितोषिकासह आणखीन सात पारितोषिक पटकावली,अर्थातच ह्यातून दिसून आले की साक्षी तुंगची.एक नवी ओळख स्वतःची निर्माण करून सावित्रीच्या लेकी सर्वांवर भारी, हे त्यांनी दाखवून दिले.सांगली जिल्हा परिषदेच्या सीईओपदी २००३ मध्ये रिचा बागल यांनी कारकीर्द घडवली. त्यानंतर तब्बल २० वर्षांनी २०२३ मध्ये तृप्ती धोडमिसे यांची सीईओपदी नियुक्ती झाली. काजल दयानंद कांबळे. सांगलीच्या अभयनगरमध्ये राहणारी काजल बी.ए. आहे. निवृत्त पोलिसाच्या या जिगरबाज मुलीच्या आयुष्यात एका अपघातानं गंभीर स्थिती आली खरी, पण तिनं त्यावरही मात केली. ट्रेकिंग करायचंच, हे मनोमन ठरवलेलं. तिचा पहिलाच ट्रेक हा महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर कळसुबाई शिखर. १ जानेवारी २०२१ रोजी छत्रपती संभाजीनगरच्या शिवुर्जा प्रतिष्ठानच्या शिवाजी गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तिनं हे शिखर सर केलं. त्यानंतर ८ मार्च २०२१ रोजी तिने ९० अंशाचा वजीर सुळका सर करण्याचं ठरवलं. वजीर सुळका पार करणारी काजल महाराष्ट्रातील पहिली दिव्यांग मुलगी ठरली.