सांगलीमध्ये जिल्हा परिषदेतून न्युमोनिया मुळे होणाऱ्या बालमृत्यू चे प्रमाण हे वाढीस दिसू लागले

0

 

सांगलीमध्ये जिल्हा परिषदेतून न्युमोनिया मुळे होणाऱ्या बालमृत्यू चे प्रमाण हे वाढीस दिसू लागले 

सीईओच्या सूचना - समन्वय हा गरजेचा....

सांगलीमध्ये जिल्हा परिषदेतून न्युमोनिया मुळे होणाऱ्या बालमृत्यू चे प्रमाण हे वाढीस दिसू लागले आहे हे प्रमाण कमी करण्याकरिता २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत अभियान हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ह्या उपक्रमामध्ये आरोग्य यंत्रणेने ही दक्षता घ्यावी की पूर्ण अभियानातून एक ही बालक लासिकरणापासून वंचित राहणार नाही ह्याबाबत पूर्णपणे दक्षता घ्यावी अशी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिल्या.यांच्या नियमावली प्रमाणे ह्याबद्दल चर्चा करण्यात आली, तालुकास्तरावरील आरोग्य अधिकारी उपस्थित होते.शून्य ते पाच वयोगटातील न्युमोनियामुळे होणारे बालमृत्यू कमी करण्यासाठी जिल्ह्यात दि. १२ नोव्हेंबर २०२३ ते २९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात लोकांमध्ये न्युमोनिया आजारविषयक जनजागृती करण्याबरोबरच आजारापासून संरक्षण, प्रतिबंध, उपचार याविषयी माहिती देण्यात येत आहे. न्युमोनिया आणि आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी पीसीव्हीची लस ही अत्यंत प्रभावी आहे. सार्वत्रिक लसीकरण मोहिमेअंतर्गत ६ व्या आठवड्यात, १४ व्या आठवड्यात आणि ९ व्या महिन्यात लस देण्यात येते. २०२२-२३ मध्ये जिल्ह्याचे पूर्ण संरक्षित बालकाचे प्रमाण ११९.१७ टक्के झाले होते. २०२३-२४ मध्ये नोव्हेंबरअखेर जिल्ह्याचे पूर्ण संरक्षित बालकांचे प्रमाण ६७.८९ टक्के झाले आहे.


ह्या अभियानामध्ये खरे तर ग्रामीण भागात लोकांचा जसा प्रतिसाद मिळतो तसा प्रतिसाद शहरी भागात मिळायला हवा. त्यामुळे लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने कामे करावे. अशा सूचना जिल्हा समन्वयक समिती सभा जिल्हा परिषदेमध्ये प्रभारी जिल्हाअधिकारी धोडमिसे यांनी दिल्या.





Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top