![]() |
विधवा मातांच्या पेन्शन वाढीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा |
जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे की, विधवा माता - भगिनींना संजय गांधी निराधार योजनेतून महिना सध्या एक हजार ५०० रुपये सध्या मिळत आहेत. परंतु, जर महागाईचा विचार केला तर त्यांना या विधवा माता-भगिनींना मिळणारी मदत अत्यल्प आहे. त्यामुळे ही मिळणारी पेन्शन वाढवून महिन्याला कमीत कमी तीन हजार रुपये करण्याची गरज आहे असे आंदोलन कर्त्यांनची मागणी आहे.तसेच लाभार्थ्यांच्या जाचक अटी रद्द करून जिल्ह्यात विशेष शिबिर घेऊन सर्वांना लाभ द्यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
या आंदोलनाला कडेगाव तालुका प्रमुख सविता माने, विटा महिलाप्रमुख मंदाताई पवार, राणी सावंत, विनायक शिंदे, प्रमिलाताई भिंगारदिवे, आणि भैय्या राठोड, खानापूर तालुका ग्रामीण प्रमुख सचिन माळी, खानापूर तालुक्यातील कामगार आघाडीप्रमुख हनुमंत मोहिते सचिन माने आंदोलनात सहभागी झाले होते.