आटपाडीत रस्त्यांच्या कामांवरून श्रेयवाद रंगला

0

 

आटपाडीत रस्त्यांच्या कामांवरून श्रेयवाद रंगला 

खानापूर मतदार संघातील आटपाडी येथे रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे . शहरात प्रवेश करत असताना साई मंदिर चौक ते अण्णा भाऊ साठे नगर चौका पर्यंतचा रस्ता खराब आहे तसेच या रस्त्याच्या कामांसाठी नगरविकास खात्याकडून मंजुरीही मिळाली आहे .

मात्र या विभागातील आमदारांकडूनच श्रेयवाद होत होत असल्याने या रस्त्याचे काम अजूनही रखडलेले आहे. त्यामुळे या रस्त्याचे नेमके गौडबंगाल काय आहे असा प्रश्न आटपाडी शहरामधील सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे

गेल्या काही महिन्यांपूर्वी आटपाडी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचयातीमध्ये झाले होते त्यावेळी याच रस्त्याच्या कामांबद्दल नेत्यानी गाजावाजा करून या रस्त्याला मंजूरी दिली तसेच रस्त्याच्या सुसज्जीकरणासाठी मोठी मोठी स्वप्ने रंगवली पण ती सत्यात काही उतरली नाही . तसेच नेत्यांच्या श्रेयवादामुळे रस्त्याच्या निधीसाठी अडथळा निर्माण होत असल्याच्या चर्चा होत आहेत पण या सर्वाचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे .



Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top