राज्यातील शिवभक्त १३ ला विशाळगडावर धडकणार

Online Varta
0

 संभाजीराजे : दीड वर्षे सरकार, प्रशासनाने काहीही केले नाही




कोल्हापूर : विशाळगडावर प्रचंड

अतिक्रमण आहे. येथे कत्तलखाने आहेत. कोंबड्या, बकऱ्या कापल्या जातात. मद्यपान होत आहे. यामुळे दीड वर्षापूर्वी बैठक घेऊन विशाळगड अतिक्रमणमुक्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दीड वर्षात शासन, प्रशासनाने यासाठी काहीही केले नाही. म्हणून १३ जुलैला दुपारी दोन वाजता माझ्यासह राज्यातील शिवभक्त विशाळगडावर धडक देतील, असा इशारा माजी खासदार संभाजीराजे यांनी रविवारी दिला.

शासकीय विश्रामगृहात आयोजित शिवभक्तांच्या बैठकीत ते बोलत होते. इतिहास संशोधक डॉ. वसंतराव मोरे, मंजुश्री पवार प्रमुख उपस्थिती होते.

संभाजीराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व युद्धे सांगून केलेली नव्हती. यामुळे शिवभक्त विशाळगडावर जाऊन काय करणार हे आताच जाहीर करणार नाही. आम्हाला तिथे जाण्याचा अधिकार आहे. डॉ. मोरे म्हणाले, विशाळगड येथील अतिक्रमण काढून ऐतिहासिक पावित्र्य जपलेच

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या मनात काय ?

संभाजीराजे म्हणाले, रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याला आल्यानंतर

राजदरबारातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी विशाळगड अतिक्रमणमुक्तीसंबंधी शिवभक्तांच्या मनात जे आहे तेच होईल, असे बोलले होते; पण त्यांनी काहीही केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या मनात काय आहे, हे आता शिवभक्तांना पाहायचेच आहे.

कोणत्याही धर्माविरोधात नाही

• विशाळगडावरील अतिक्रमण काढावे, अशी आमची ठाम भूमिका आहे. दोन्ही बाजूंची अतिक्रमणे काढलीच पाहिजे, यासाठी शिवभक्तांचा लढा सुरू आहे. लढा कोणत्याही धर्माविरोधात नाही, असा खुलासा संभाजीराजे यांनी केला. • अतिक्रमण काढण्याची मोहीम कोणत्याही धर्माविरोधात नाही. इतिहास हाच धर्म समजून तेथील अतिक्रमणं काढलीच पाहिजे, अशी भूमिका मंजुश्री पवार यांनी मांडली.

पाहिजे. मंजुश्री पवार म्हणाल्या, ताराबाई पुत्र पहिले शिवाजी यांचा राज्याभिषेक तेथे झाला होता. इतके महत्त्व या गडाला आहे.

विनोद साळोखे, आबा वेल्हाळ,

खोरं, फावडं घेऊन जाऊ

१३ जुलैला विशाळगडावर जाऊन काय करणार, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. यावर शिवभक्त रुपेश पाटील यांनी फावडं, खोरं घेऊन जाऊ, असे सुचवले. संभाजीराजे जो आदेश देतील, त्यानुसार आंदोलन करणार असल्याचे बैठकीत शिवभक्तांनी सांगितले.

विजय ससे, संजय पवार, श्रध्दा माने, हेमंत चव्हाण, गीता हासूरकर, नाना सावंत यांनीही भावना व्यक्त केल्या. फत्तेसिंह सावंत, दिलीप सावंत, विनायक फाळके आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top