विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपवर निवडणूक धांदळीचा गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतरचा हा आरोप महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात असून, “ही निवडणूक म्हणजे लोकशाही चोरीचं नकाशा आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.
राहुल गांधींचा आरोप आहे की, भाजपने निवडणूक आयोगाच्या नियुक्तीपासूनच हस्तक्षेप सुरू केला असून, सर्व यंत्रणा आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. त्यांनी असा इशाराही दिला की, "बिहारमध्ये अशाच प्रकारची मॅच फिक्सिंग सुरू आहे, आणि भाजपकडून लोकशाहीची पद्धतशीर पायमल्ली केली जात आहे."
भाजपकडून जोरदार प्रतिउत्तर
राहुल गांधींच्या या आरोपावर भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली. “राहुल गांधी यांचे आरोप जॉर्ज सोरोसच्या स्क्रिप्टसारखे वाटतात, ज्यांचा उद्देश भारतीय संस्थांवर अविश्वास निर्माण करणे आहे,” असे मालवीय यांनी म्हटले.
राहुल गांधींच्या या आरोपावर भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली. “राहुल गांधी यांचे आरोप जॉर्ज सोरोसच्या स्क्रिप्टसारखे वाटतात, ज्यांचा उद्देश भारतीय संस्थांवर अविश्वास निर्माण करणे आहे,” असे मालवीय यांनी म्हटले.
राजकीय वातावरण तापले
या आरोपांमुळे देशातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधारी पक्ष यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिका रंगण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यामुळे विशेषतः बिहार आणि महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
विरोधकांचा रोख स्पष्ट
‘इंडिया’ आघाडीकडून सतत असे आरोप केले जात आहेत की, निवडणूक आयोग, तपास यंत्रणा आणि प्रसारमाध्यमे यांचा वापर सत्ताधारी पक्षाच्या फायद्यासाठी केला जातो. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याने त्या मुद्द्याला अधिक बळ दिलं आहे.
या आरोपांमुळे देशातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधारी पक्ष यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिका रंगण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यामुळे विशेषतः बिहार आणि महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
विरोधकांचा रोख स्पष्ट
‘इंडिया’ आघाडीकडून सतत असे आरोप केले जात आहेत की, निवडणूक आयोग, तपास यंत्रणा आणि प्रसारमाध्यमे यांचा वापर सत्ताधारी पक्षाच्या फायद्यासाठी केला जातो. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याने त्या मुद्द्याला अधिक बळ दिलं आहे.