मिरजेत वादग्रस्त कार्यालय हटवले...

0


मिरजेत वादग्रस्त कार्यालय हटवले... 

मिरजमधील शिवसेनेच्या दोन्ही गटाची धूसफूस गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. अनंत चतुर्दशी दिवशी उभारण्यात येणा-या स्वागत कमानीवरून देखील दोन्ही गटात जोरदार वादावादी झाली होती. परंतु त्या वादावर पोलिसांनी पडदा टाकला. जनसंपर्क कार्यालय उभारण्याच्या माध्यमातून हा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला. आता दोन्ही गटात हाणामारी घडली. पुढील काळात हा वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे.

मिरजमधील किल्ला ह्या परिसरात ठाकरे गटाचे शिवसेना  मिरज तालुका प्रमुख चंद्रकांत मैगुरेयांनी जनसंपर्क सुरू करण्यासाठी काम चालू केले होते परंतु ह्याची माहिती शिंदे गटाच्या शिवसेना मिरज तालुका प्रमुख किरण रजपूत ह्यांनी कळाली, त्याचा वेळेत किरण रजपुत त्या ठिकाणी पोचले त्यांनी शिवसेना गटावर आक्षेप केला, की हे बांधकाम हे महानगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण होत असल्याचे सांगितले, ही जागा आमचीच आहे आणि येथेच जनसंपर्क कार्यालय होणार अशी भूमिका मैगूरे ह्यांनी कली,ह्या सगळ्या प्रकरणात मिरजेतील ठाकरेंच्या

जनसंपर्क कार्यालयावरून शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार राडा झाला. दोन्ही गटाचे पदाधिकारी शिवीगाळ करत एकमेकांच्या अंगावर धावून गेले. यावेळी हाणामारी झाली. अखेर पोलिस बंदोबस्तात महापालिकेकडून वादग्रस्त कार्यालय हटविण्यात आले.घटनास्थळी महानगरपालिका उपयुक्त स्मृती पाटील ह्या अतिक्रमण विभागाच्या फौजफाट्यासह दाखल झाल्या,महिला पदाधिकाऱ्यांना अश्रू अनावर झाल्याने त्यांनी देखील हंबरडा फोडत रस्त्यावर ठिय्या मारला. परंतु त्यांना देखील पोलिस वाहनात घालून ताब्यात घेण्यात आले. काही वेळानंतर चंद्रकांत मैगुरे यांच्यासह सर्व पोलिसांनी सोडून दिले. पदाधिकाऱ्यांना आता पालकमंत्र्यांना घरात बसवणार.

जनसंपर्क कार्यालय हटविण्यासाठी राजकीय आणि पोलिस बळाचा वापर करण्यात आला. यामागे जर पालकमंत्री असतील तर त्यांना घरात बसविल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. तसेच अतिक्रमण हटविलेल्या ठिकाणीच पुन्हा कार्यालय करण्याचा इशारा मैगुरे यांनी दिला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top